बदली परिपत्रक दि २० जून २०२२ चा अर्थ,सूचना व स्पष्ठीकरण

 


बदली परिपत्रक दि २० जून २०२२ 

अर्थ,सूचना व स्पष्ठीकरण 

महाराष्ट्र राज्याचे उपसचिव मा श्री का गो वळवी यांनी दि २० जून २०२२ च्या परिपत्रकानुसार.....

              सन 2022 मध्ये  जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन द्वारे बदल्या करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार याबाबतची कार्यवाही फेब्रुवारी२०२२  पासून सुरू आहे. या बदल्या करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन वेळोवेळी संदर्भातील पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत. बदल्या करताना येणाऱ्या अडचणींवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी नूडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.  माननीय न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिल्याप्रकरणी  कशी कार्यवाही करावी, तसेच अवघड क्षेत्र घोषित करणे याबाबत खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत. 

  •        एक समन्वयकाची नियुक्ती करणे
 

          सन 2022 मधील बदल्या करण्याच्या संपूर्ण कार्यवाहीत सहभागी असलेल्या कोणत्याही जिल्हा परिषद सॉफ्टवेअर कंपनी, कोणतीही संस्था यांना येणाऱ्या अडचणींना योग्य ते मार्गदर्शन तात्काळ करण्यासाठी खालील प्रमाणे नोडल / समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. 

अ)राज्य समन्वयक

 1. श्री सचिन ओंबासे, भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा

2.  श्री विनय गौडा, भाप्रसे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा

 ब) विभागीय समन्वयक: संबंधित महसूल विभागाचे उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा समन्वयक संबंधित जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

  माननीय न्यायालयाने बदली करण्याचे आदेश दिलेले शिक्षक

      अ ) बदली पात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक असेल किंवा नसेल मात्र ज्या शिक्षकांची माननीय न्यायालयाने विवक्षितपणे शाळेवरून  बदली करण्याचे आदेश दिले असल्यास अशा शिक्षकांची ऑफलाइन द्वारे संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी बदली करावी.

ब) माननीय न्यायालयाचे बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले असतील व तो बदलीपात्र शिक्षक एका जिल्ह्यात दहा वर्षे व त्यापैकी एका शाळेत पाच वर्षे सेवा बदली अधिकार पात्र शिक्षक एका जिल्ह्यात दहा वर्षे व त्यापैकी घोषित अवघड क्षेत्रात एका शाळेत किमान तीन वर्षे सेवा हे बदलीसाठी च्या निकषांची पूर्तता करीत असल्यामुळे या शिक्षकांचा नियमानुसार ऑनलाईन होणाऱ्या सिस्टीम मध्ये समावेश होत असल्यामुळे अशा शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन द्वारे कराव्यात .

क ) वरील ब ) मध्ये  नमूद केल्याप्रमाणे बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नसेल अशा शिक्षकांचा सध्या विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या सिस्टीम मध्ये समावेश होऊ शकणार नाही, याकरता सिस्टीम मध्ये सुधारणा करण्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी आणखी लागले असे सॉफ्टवेअर कंपनीचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

               सन 2022 या वर्षातील बदल्या करण्यात आधीच विलंब झालेला असून मुलांच्या शाळाही सुरू झालेले आहेत, त्यामुळे आणखी विलंब  करता येणार नाही. त्यामुळे बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षक नाही, मात्र माननीय न्यायालयाने बदलीचा विचार करण्याचे आदेश दिले आहेत अशी प्रकरणे असल्यास अशा शिक्षकांच्या बदल्या संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी शेवटच्या टप्प्यात ऑफलाईन द्वारे कराव्यात.

        तीन अवघड क्षेत्र घोषित करणे 

   आतापर्यंत दिनांक २७ फेब्रु २०१७  च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार घोषित केलेल्या अवघड क्षेत्रानुसार बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत/ असाव्यात. कोरोना १९ च्या  महामारी मुळे मागील 2021 यावर्षी बदल्या होऊ शकल्या नाहीत. दिनांक 7 4 2019 रोजी च्या सुधारित शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुधारित अवघड क्षेत्र घोषित करून यापूर्वीची अवघड क्षेत्रा ची यादी व सुधारित यादी अपलोड करावी जेणेकरून या वर्षीच्या बदल्या करताना पूर्वी अवघड क्षेत्रातील वर्षे काम केलेल्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना पूर्वी ची यादी सहज उपलब्ध होईल. मात्र सध्या सुगम क्षेत्रात असलेल्या शाळा दिनांक ७-४-२०१७  शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड क्षेत्र म्हणून घोषित असल्यास अशा शाळेतील शिक्षकांची सेवा ही अवघड क्षेत्र घोषित केल्यापासून किंवा त्या शाळेत नियुक्ती स्वीकारण्याच्या दिनांकापासून यापैकी जी नंतरची असेल तेव्हा पासून अवघड क्षेत्रातील सेवा असल्याचे सांगण्यात येईल.  त्यामुळे असा शिक्षक अवघड क्षेत्र घोषित केल्या बरोबर बदली अधिकार पात्र शिक्षक होणार नाही याची नोंद घ्यावी.

           जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची कार्यवाही सुरू असून त्याअंतर्गत शिक्षकांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही ची मुदत आज दिनांक २० जून २०२२  रोजी संपुष्टात येत आहे,तथापि सदर प्रणालीमध्ये आणखी बऱ्याच शिक्षकांची माहिती अद्यावत करावयाची असल्याची बाब आयटी कंपनीने निदर्शनास आणून दिले आहे, त्यामुळे सदर कार्यवाही दिनांक २७ जुन२०२२  पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानुसार संगणक प्रणाली मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत.

मा सचिव  श्री वळवी साहेब यांचे पत्र पहा.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .